अतिमहत्वाचे तात्काळ - शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक-०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण करणेबाबत शिक्षण संचालक यांचे आदेश

प्राथमिक संचालकांनी दिनांक 11 जून 2024 रोजी निर्गमित केलेले परिपत्रकानुसार शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक-०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक ०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याच्या शासनाच्या सुचना असल्याने सदर सर्वेक्षण राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने SOP व माहिती संकलनाचे formats तयार करून पुढील योग्य त्या त्वरीत कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठविली आहे. त्यानुसार सर्वेक्षणाच्या विहित पत्रकांमध्ये माहिती भरून विहित प्रमाणपत्रासह सचालनालयास सादर करावे. सदर प्रपत्रांमधील माहिती भरतांना केवळ (ISM V6) युनिकोड- "DVOT-SurekhMR" या Font चा वापर करून Font Size-11 मध्येच भरावयाची आहे. याची कटाक्षाने नोंद घ्यावी. याबाबत आपण तसेच आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी यांनी यातील सुचनांचे तंतोतंत पालन करून सर्वेक्षण राबविण्यासाठी कार्यवाही करावी.

यापूर्वी देखील शासनाकडून शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते, त्याच धर्तीवर या सर्वेक्षणाशी संबंधित शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची संपर्कात राहून कार्यवाही करावयाची असून सदरचे काम पूर्णत्वास आणावयाचे आहे. शासनाच्या संबंधित विविध विभागांना याबाबत लिहिलेल्या पत्राची प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे.

तरी याबाबत सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक यांनी सदर SOP मधील सुचना लक्षात घेऊन आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व योजना) तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद मधील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने आदेशित करावे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षणाधिकारी यांना त्यांचे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास अधिकारी तसेच सर्वेक्षणा संबंधित इतरही सर्व विभागातील अधिकारी तसेच तालुका व ग्रामिण स्तरावरील कार्यालयांशी संपर्क करून या बाबत सर्व नागरी व ग्रामिण स्तरावरील बैठकींचे नियोजन करण्याचे आदेश द्यावेत.

या कामासाठी सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांनी त्याचे कार्यालयात Excel मधील तज्ञ असलेल्या एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी की ज्यामुळे सर्वेक्षणाच्या विहित पत्रकांमधील माहितीचे वैधतीकरण योग्य व जलद रित्या होईल व सर्वेक्षणाची माहिती शासनास विहित वेळेत सादर करणे शक्य होईल. या नियुक्त केलेल्या सर्व जिल्हा व विभाग स्तरावरील नोडल अधिकाऱ्याची यादी संबंधित विभागिय शिक्षण उपसंचालक यांनी सर्वेक्षण सुरू होताच संचालनालयास सादर करावी.


सहपत्रेः वरील प्रमाणे


(शरद गोसावी)

 शिक्षण संचालक (प्राथमिक).

महाराष्ट्र राज्य, पुणे



सवेक्षणाचा अवलंब

(१) सर्वेक्षणाचा कालावधी- दिनांक ०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४

(२) उद्दिष्ट्येः

(१) शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे,

(२) बालकांचे पालकांसोबत होणारे स्थलांतरीत थांबविणे,

(३) स्थलांतरीत बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे,

(४) स्थलांतरीत होऊन जाणाऱ्या बालकाना शिक्षण हमी कार्ड देणे.

(३) सर्वेक्षण करावयाच्या बालकांचे प्रकार

अ) शाळाबाह्य व अनियमित बालकेः-


१) (E१):- शाळेत कधीच दाखल न झालेली बालके,

२) (E२): शाळेत प्रवेश घेतलेली परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेली, एका महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असलेली बालके,

ब) स्थलांतरीत बालकांच्या बाबतीत मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकरण होते.

१) कुटुंबासोबत स्थलांतरीत होऊन येणारी बालके,

२) कुटुंबासोबत स्थलांतरीत होऊन जाणारी बालके


(४) सर्वेक्षणाची कार्यपद्धती, मार्गदर्शक सूचना व सामान्य प्रतिबंधात्मक उपायः यापूर्वी देखील शासनाने वेळोवेळी शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्वेक्षणाचे आयोजन केलेले आहे. तरी देखील काही बालके मधूनच शाळा सोडतांना दिसून येतात. तर काही पालकांसोबत स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांचे शिक्षण खंडीत होते. या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण घेणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करून त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरु ठेवणे व बालकांची गळती शून्यावर आणणे हा सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. बालकांना शाळाबाह्य होण्यापासून रोखण्यासाठी दिनांक-०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये व्यापक स्वरूपात राबवियात यावा. या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास, कामगार आयुक्तालय, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागाच्या सहभागाने ही मोहिम राबवावयाची आहे.

शाळेत न जाणारी व मध्येच शाळा सोडणारी बालके तसेच विविध कारणांमुळे होणारे कामगार कुटुंबांचे स्थलांतर यामुळे ३ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य होत असतात. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सदरचे सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत Excel मध्ये माहितीची प्रपत्रे, प्रपत्र-अ, ब, क आणि ड, त्यांचे गोषवारा पत्रके व त्यासदर्भात प्रमाणपत्र विहित केलेली आहेत. त्यानुसार शाळाबाह्य, अनियमितपणे व स्थलांतारीत होऊन आलेल्या बालकांची माहिती त्यात भरावयाची आहे,

. प्रपत्रांबाबतः -


(१) प्रपत्र-अः- यामध्ये कुटुंबाची सर्वसाधारण माहिती भरणे. (२) प्रपत्र-वः - यामध्ये शाळाबाह्य व अनियमितपणे शाळेत जाणाऱ्या बालकांची माहिती भरणे,


(1) शाळेत कधीच दाखल न झालेली बालके (E१), (ii) एका महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित रहात असलेली बालके (E२) याची माहिती भरावयाची आहे.


(३) प्रपत्र-कः यामध्ये स्थलांतारीत होऊन गेलेल्या बालकांची माहिती भरावयाची आहे.


(४) प्रपत्र-डः - यामध्ये स्थलांतारीत होऊन आलेल्या बालकांची माहिती भरावयाची आहे.


या वरील सर्व पत्रकांचे गोषवारा पत्रके.


२. सर्वेक्षण कोठे करावे?


या सर्वेक्षणात दिनांक-०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नलस, हॉटेल्स- खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजार तळ, वीट भट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर असण्याची शक्यता असेल अशी ठिकाणे. तसेच वंचित गटातील वस्त्यांमधील बालकांना, स्थलांतरित होऊन आलेली कुटुंबे ज्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे अशा सर्व ठिकाणी सदर मोहिमेत राबवावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व सर्व खेडी, वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, शेतमळे व जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात यावा. महिला व बालविकास विभागांतर्गत बालगृहे, विशेष दत्तक संस्था, निरिक्षणगृह यामधील बालकांचाही यामध्ये समावेश करण्यात यावा. एकही शाळाबाह्य किंवा स्थलांतरीत बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता घण्यात यावी, घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करावे.

३. या मोहिमेत १८ वर्षे वयोमर्याद पर्यंतच्या दिव्यांग बालकांचा समावेश करण्यात यावा.

 ४. तसेच शासनाने यापूर्वी वेळोवेळी घेतलेल्या शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांच्या सर्वेक्षणाच्या वेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचना ही लक्षात घ्याव्यात. तसेच त्याप्रमाणे कार्यप्रणाली अंमलात आणावी की जेणे करून सदर कामामध्ये सोपेपणा येईल. 

५. यांसाठी बालकांचा शोध घेताना ग्राम पंचायत अभिलेखे मनपा/नपा मधील जन्मामधील नोंदी वापरणे,

६. सदरची मोहीम ही सर्व वस्ती, वाडी, गाव, वार्ड या रस्त्यावर पूर्ण करण्यात यावी, यातर्गत ग्रामीण स्तरावरील समितीने प्रत्येक घरी जाऊन आढळून आलले प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होईल याची काळजी घ्यावी. पालक व गावकऱ्यांच्या सहभागाने विशेष नोंदणी मोहीम राबवून त्या बालकास त्याच्या वयानुरूप वर्गामध्ये दाखल करावे. सदर मोहीम ढोल ताश्यांच्या गजरात दिंडी स्वरूपात राबविणे,

७. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामिण व नागरी) यांच्या समन्वयाने गांव, केंद्र, बीट, विभाग व शाळास्तरानुसार अशा प्रकारे ग्रामिण ते नागरीस्तरापर्यंत करावयाच्या कामाचे नियोजन तयार करावे, तसेच सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांची यादी तयार करून कामकाजाचे निश्चितीकरण करून संबंधितांना आदेशित करावे.

८. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास विभाग). बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेल्या कर्मचारी यादीनुसार ग्रामिण व नागरी कामकाजाच्या जवाबदाऱ्या वाटप करून संबंधितांना आदेशित करण्यात यावे.

९. कामकाजाचे वाटप व जबाबदाऱ्या निश्चित केल्यानंतर संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. यात प्रपत्रांमध्ये माहिती कशी भरावी व भरतांना ती माहिती वैध असल्याची खात्री करूनच पत्रकांमध्ये माहिती भरण्याचे प्रशिक्षण द्यावे. पत्रकामधील माहिती व संबंधित पत्रकांच्या गोषवारा पत्रकांमधील माहिती तंतोतंत जुळण्याबाबतची खात्री करावी. ते जुळल्याशिवाय माहिती अंतिम म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी.

१०. क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी जबाबदार अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या तारखेप्रमाणे प्रत्यक्षात मोहिमेस सुरुवात करून दैनिक अहवाल सादर करावा.

 ११. मोहिमेचा सर्वेक्षण अहवाल गट पातळी वरील अधिकारी यांनी आपल्या जिल्हा नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावा,

१२. सर्वेक्षणामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या १० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार गठीत सर्व स्तरावरील बालसंरक्षण समितीची ही जबाबदारी राहील.

१३. बालकांचे पालकांसोबत स्थलांतर होऊच नये यासाठी बालकांना पालकांच्या नातेवाईकांकडेच ठेऊन बालकांचे शिक्षण अबाधित राखण्याबाबत प्रयत्नशील रहावे. यासाठी गाव ते जिल्हा अशा प्रत्येक स्तरावर जाणीव जागृती कार्यशाळा/मेळावे आयोजित करावेत. यामध्ये स्थलांतरामुळे होणारे शैक्षणिक नुकसान व त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून द्यावेत. स्थानिक पातळीवर किमान बालकांचे पालकांसोबत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी समुपदेशका मार्फत पालकांचे समुपदेशन करावे, स्थानिक पातळीवर स्थलांतर रोखण्यासाठी मुलांच्या जवळचे नातेवाईक, हंगामी वसतिगृह, सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत घेणे,

१४. स्थानिक पातळीवर कार्यरत बालरक्षक यांना सोबत घेऊन सर्वेक्षणात व नंतर स्थलांतरीत परिसरामध्ये कार्यरत बालरक्षकांचा समन्वय साधणे,

१५. स्थलांतरित होऊन येणाच्या कुटुंबाचे राहण्याचे ठिकाण/वस्ती शाळेच्या नजीक किंवा परिसरात असेल याची दक्षता सरपंचाच्या अध्यक्षतेखालील गाव स्तर समिती घेईल. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबाचे राहण्याचे ठिकाण शाळेच्या नजीक असल्यास अशा कुटुंबातील प्रत्येक बालके शाळेत दाखल करणे किंवा त्यांची शाळेतील उपस्थिती टिकविणे सोयीचे होईल.

१६. स्थलांतरित कुटुंबाची वस्ती शाळेपासून जास्तीत जास्त एक किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास अशा कुटुंबातील बालकांना संबंधित कारखाने उद्योग, व्यवसायिक यांच्या सहकार्यातून वाहतुक व्यवस्था पुरवून नियमित शाळेत आणण्यात यावी. यासाठी याबाबत गाव व तालुका पातळीवरील समितीने आवश्यक समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी.

१७. एका ठिकाणी ३० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील व त्यांना नजीकच्या नियमित शाळेत येणे सोयीचे नसल्यास अशा ठिकाणी संबंधित व्यावसायिकांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची नियुक्ती करुन त्या मुलांना शिक्षणाची सुविधा द्यावी. अशा मुलांच्या शिक्षणाचे संनियंत्रण नजीकच्या नियमित शाळेमार्फत होईल.

१८. शाळांनी CSR च्या माध्यमातून हंगामी वसतीगृहाची निर्मिती, साखर कारखाने, उद्योग, व्यवसायिक यांच्या समन्वय व सहकार्यातून स्थलांतरित बालकांकरिता आवश्यक वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी इत्यादी भौतिक सुविधा स्वयंसेवक/मदतनीस यांच्या माध्यमातून वाहतूक सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

१९. स्थलांतरित होऊन येणान्या बालकांना नियमित शाळेत दाखल करून मोफत शिक्षणासह शालेय पोषण आहार व अन्य शासकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. हंगामी वस्तीगृहासाठी किमान विद्यार्थी संख्येची अट कमी करावी.

२०. . हंगामी वस्तीगृहात सकाळच्या न्याहरी ऐवजी जेवण देणे आवश्यक.

२२. लेखन साहित्य तरतुदीची फेर निश्चिती करावी.

. विविध विभागांच्या निवासी शिक्षण केंद्राचा हंगामी उपयोग होऊ शकेल काय? या शक्यतेचा  विचार करण्यात यावा.

२४. याकामी लोकप्रतिनिधी, विविध शालेय स्तरावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी.

२५. स्थलांतरीत मुलांना शिक्षण हमी कार्ड (EGC) देऊन त्यांचे १००% प्रवेश स्थलांतरीत परिसरातच होतील यासाठी प्रयत्न करणे,

२६. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित होऊन येणाऱ्या बालकांची शाळेतील उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी शासन नियमानुसार सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत प्रयत्न रहावे. (उदा. मोफत गणवेश, लेखन साहित्य, प्रोत्साहन भत्ता, उपस्थिती भत्ता मध्या भोजन इत्यादी).

२७. या मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी समग्र शिक्षा अंतर्गत लेखन साहित्य यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी. समता विभाग (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) बालरक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करेल.

२८. स्थलांतरामुळे नविन शाळेत वर्गात विद्यार्थ्यांमध्ये तात्पुरते दाखल झालेल्या बालकास समजून घेणे आवश्यक आहे. अशा बालकास इतर विद्यार्थ्यांसह शिक्षण प्रवाहात सामावून घेताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची हस्तपुस्तिका/मार्गदर्शक सूची समता विभागाने संबंधित शाळेस उपलब्ध करून देणे.


(५) सर्वेक्षणाची अंमलबजावणीः -

१. सदर सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध स्तरावर समित्यांचे परिशिष्ठ-१ नुसार गठण करण्यात आले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी.

२. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांची गावनिहाय यादी संकलित करून शाळानिहाय जनरल रजिस्टर तसेच विद्यार्थी हजेरी पत्रक व गावपंजिका पडताळणी करून अद्यावत करणे

३. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेत दाखल करून दाखल झालेल्या बालकांची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करणे.

४. या मधील बालकांच्या नोंदी घेण्याकरीता विहित प्रपत्रे "अ", "ब"," "क" आणि "ड" त्यांच्या गोषवारा पत्रकांसह सोबत देण्यात आली आहेत. यामध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांच्या नोंदी अचूकपणे घेण्यात याव्यात. अशा बालकांना विशेष प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यासाठी यावे व ही माहिती संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून वयानुरूप दाखल मुलांसाठी अध्ययन सुविधा पुरविण्यास मदत होईल.

(६) या विषयी व्यापक जनप्रबोधनः राज्यातील अनेक नागरिकांपर्यंत या मोहिमेची माहिती सुलभरित्या पोहोचावी यासाठी खालील पद्धतीने मोहिमेबाबतचे व्यापक जनप्रबोधन प्रत्येक स्तरावरील समितीने करावे.

१. स्थानिक दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे तसेच इतर प्रसार माध्यमांद्वारे याबाबत व्यापक प्रमाणात उद्बोधन करून नागरिक, पालक, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे यांना सहभागी करून घेण्यात यावे.

२. स्थानिक कलाकार आणि नामांकित व्यक्ती मार्फत याबाबत प्रत्यक्ष संवाद घडवून आणावा.

३. सदर मोहिमेचा प्रसार मोहिमेच्या प्रारंभापूर्वी सोशल मिडियाच्या माध्यमातून, Whats App, Facebook, Twitter, Instagram; याद्वारे विविध संस्था, संघटना व स्वयंसेवी संस्था यांना याबाबतचा जनप्रसार व्यापक प्रमाणात करण्याबाबत आवाहन करण्यात यावे.

४. राज्याच्या या महत्वपूर्ण उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती यांचा गाव पातळीवरील शोध मोहिम आणि गृहभेटी यामध्ये संपूर्ण सहभाग घ्यावा.

५. पंचायत समिती सभापतीसह पंचायत समिती सदस्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील गावामधून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे.

६. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापतीसह सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांना आपापल्या कार्यक्षेत्रात यामध्ये सहभागासाठी विनंती करावी.

७. सदर कामामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी इत्यादींचे देखील योगदान घ्यावे.


शिक्षण संचालक यांचे सर्वेक्षणाबाबत संपूर्ण परिपत्रक परिशिष्टांसह डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. आधार कार्ड नोंदणी केली नसल्याने तसेच आधार कार्ड काढण्यास प्रयत्न करावे तर त्या पालकांजवळ जन्मनोंद सुद्धा नसते,जन्म कुठे तरी बाहेर,ऊसतोड मजुरी करतांना झालेला असतो ..असे पालक तयार असूनही पाल्य दाखल करतांना अडचणी येतात

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.